Marmik
Hingoli live

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तिघांवर कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा. तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये. त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीस आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांभ घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

सदर सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 12 ते 19 डिसेंबर यादरम्यान कार्यवाही केलेली आहे.

यामध्ये आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या 2 फेसबुक व एका इंस्टाग्राम वापर करताना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देऊन सोशल मीडिया पेज व अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

अशा प्रकारे जाती, धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

नागरिकांनी ऑनलाइन होणारे व्यवहार काळजीपूर्वक करावे तसेच आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल हिंगोली येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.

Related posts

29 जुलैला होणार हिंगोली आइडल _6

Gajanan Jogdand

जि. प., पं. स. निवडणूक; आरक्षण निश्चितीसाठी 13 जुलै रोजी सभा

Gajanan Jogdand

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment