Marmik
Hingoli live

जिल्ह्यात सर्वदूर भिज पाऊस; पिकांना जीवदान

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी सर्व दूर भिज पाऊस झाला. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होऊन काही प्रमाणात का असेना पिकांना जीवनदान मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर काही भागात अल्पसा पाऊस झाला. पावसाने दीर्घकाळ दडी दिल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली होती.

सदरील पिके पाण्याअभावी कोमेजून जळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. तसेच तसेच पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले होते.

सप्टेंबर महिन्यात 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी रात्री आणि पहाटे पाच ते साडेपाच वाजेपासून रिमझिम व भिज पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत हिंगोली येथे हा पाऊस सुरू होता तर सेनगाव व इतर ठिकाणी दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता.

झालेल्या या भिज पावसाने काही प्रमाणात का असेना खरीप पिकांना फायदा झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Related posts

उद्धव ठाकरे यांच्या सभेत खुर्च्यांसाठी नागरिकांची पळापळ; सभा आयोजकांचे नियोजन विस्कटले

Santosh Awchar

घोटा देवी संस्थान मध्ये आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कार्याध्यक्षांवर कारवाई करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 जानेवारीपासून उपोषण सुरू, प्रशासनाकडून अद्याप दखल नाही

Gajanan Jogdand

विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment