Marmik
Hingoli live क्राईम

आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली. यावेळी 24 लाख 38 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

या अनुषंगाने 31 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील एकूण सात गुन्ह्यातील सोन्या – चांदीचे दागिने व नगदी असे किंमती 5 लाख 73 हजार 500 रुपये, 21 वाहने किंमत 15 लाख 10 हजार रुपये, 21 मोबाईल फोन किंमत 2 लाख 80 हजार रुपये व इतर मुद्देमाल 74 हजार 700 रुपये असा एकूण 24 लाख 38 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून आजपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून दोन कोटी 72 लाख 47 हजार 92 रुपये एवढा मुद्देमाल फिर्यादी सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस हवलदार सुनील अंभोरे, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडले. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.

Related posts

स्मार्ट प्रकल्प: अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून केले रवाना 

Santosh Awchar

रोहीत्रासाठी शेतकऱ्यांचे आजेगाव येथील 33 के. व्ही. उपकेंद्रा समोर आमरण उपोषण

Gajanan Jogdand

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक संपन्न; 23 ऑगस्ट रोजी विधानभवन समोर करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन

Gajanan Jogdand

Leave a Comment