Marmik
Hingoli live क्राईम

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली- येथील समाजात, जाती – धर्मात तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल, अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या एकूण 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर हिंगोली येथील सायबर सेल विभागाकडून कारवाही करण्यात आली आहे.

हिंगोली येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा. तसेच सोशल मीडिया वापर करून त्यात बाधा येऊ नये, त्यावर प्रतिबंध बसावा.

त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार दीपक पाटील दत्तात्रय नागरे, इरफान पठाण, महिला पोलीस शिपाई प्रणिता मोरे यांची नेमणूक केली आहे.

सदर सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 यादरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने (यामध्ये 9 व्हाट्सअप वापरकर्ते व 3 फेसबुक वापरकर्ते) त्यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वय नोटीस देऊन अशा प्रकारे जाती, धर्मात तेढ निर्माण करणारे

तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. असे कृत्य करणाऱ्यांची जेलवारी अटळ असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कळविले आहे.

Related posts

सेवा पंधरवाडानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातयुवती सक्षमीकरण कार्यक्रम

Gajanan Jogdand

कळमनुरी येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सात जणांविरुद्ध कार्यवाही

Gajanan Jogdand

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक संपन्न; 23 ऑगस्ट रोजी विधानभवन समोर करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन

Gajanan Jogdand

Leave a Comment