Marmik
Hingoli live

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 5 जणांविरुद्ध सायबर सेल कडून कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पाच जणांविरुद्ध हिंगोली येथील सायबर सेल विभागाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. या सोशल मीडिया वापरकर्त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखात टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीस आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार जी.डी. पवार, पी. एस. थोरात, जे. पी. झाडे, डी.पी. नागरे, आर.डी. मुदीराज, आय.एस. पठाण यांची नेमणूक केलेली आहे. सदर सायबर सेल विभागाने 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान कार्यवाही केलेली आहे.

त्यात काही समाजकंटकाकडून सोशल मीडियावर विविध समाजात जाती धर्मात तेढ निर्माण होईल तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट केल्या जातात. परंतु त्यावर हिंगोली सायबर सेलची टीम लक्ष ठेवून आहे.

मागील काही दिवसात अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एक फेसबुक व एक व्हाट्सअप तसेच तीन इंस्टाग्राम वापर करताना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देऊन सोशल मीडिया पेज व अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

अशा प्रकारे जाती धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी ऑनलाईन होणारे व्यवहार काळजीपूर्वक करावे, तसेच आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थिनी व नागरिकांना मार्गदर्शन

हिंगोली सायबर सेलच्या पथकाने हिंगोली बस स्थानक येथे जाऊन बसणे शाळेत येजा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच नागरिकांना सायबर सेक्युरिटी तसेच सायबर फसवणुकी बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणतीही अनोळखी एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू नये. असे केल्यास आपल्या मोबाईल मधील डाटा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आवाहन केले.

तसेच अनेक विषय जसे की सोशल मीडियावर आक्षेपार्ह कार्य पोस्ट करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका, आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, अशा प्रकारे सायबर बाबर माहिती दिली.

Related posts

अनुसूया बाल विद्या मंदिर येथे रक्षाबंधन साजरे

Gajanan Jogdand

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी- अब्दुल सत्तार

Santosh Awchar

एकता दौड रॅलीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखवली हिरवी झेंडी

Santosh Awchar

Leave a Comment