Marmik
Hingoli live News

लव्ह जिहाद विरोधात हिंगोलीतील हिंदू बंधू – भगिनी रस्त्यावर! बेकायदेशीर धर्मांतरण व लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – देशात सुरू असलेले बेकायदेशीर धर्मांतरण तसेच लव्ह जिहाद सारख्या षडयंत्रणाना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीतील हिंदू समाज बांधवांसह भगिनी रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी हिंदू समाज बांधवांच्या वतीने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे.

भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन व प्रसार करण्याचा कायदेशीर अधिकार दिलेला आहे. सोबतच स्वच्छने कोणत्याही धर्माचे अनुसरण करण्याची सवलत दिलेली आहे. परंतु मागील काळात हिंदू धर्मातील अनेक व्य बेकायदेशीरपणे पैसे, नोकरी, लग्नाचे आमिष तसेच इतर प्रलोभन दाखवून, फसवणूक करून तसेच धमकावून इतर धर्मात धर्मांतरण करून घेतल्याचे आढळून येत आहे.

याच धर्तीवर संपूर्ण देशात वयात आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण करून विवाह केल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अशा प्रकारे लव्ह जिहादच्या माध्यमातून हजारो हिंदू मुली धर्मांतरण करून इतर धर्मात पळवून नेल्या आहेत.

यापैकीच काही मुलींचा वापर देश विघातक कृतींसाठी तसेच आतंकवादी कारवायांसाठी करण्यात येत असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणेच्या निदर्शनास आलेले आहे. त्याचप्रमाणे अशा लव्ह जिहादच्या माध्यमातून पळवून नेलेल्या कित्येक मुलींची अमानुषपणे हत्या केल्या गेल्या आहेत.

या सर्व बाबी कित्येक प्रकरणातून सुस्पष्टपणे सिद्ध होऊन देखील आजपर्यंत याची गांभीर्याने दखल घेतल्या गेले नाही त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना एक प्रकारे खतपाणी मिळत आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर धर्मांतरण अविरत सुरू आहे.

ही बाब निश्चितपणे सकल हिंदू समाजाचे धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देशाच्या सुरक्षेवर संकट असून याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात देशावर मोठे संकट येऊ शकते. या गंभीर समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्म रक्षण मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

सदरील निवेदनात संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून यात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कार्यवाहीची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी स्पेशल कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी, वरील विषयांकरिता एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी.

तसेच कोणत्याही प्रकारचे प्रलोभने, धमकावणे अथवा फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करून असे बेकायदेशीर धर्मांतरण करण्यावर बंदी आणावी, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्या मार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, दिल्ली येथे हिंदू मुलगी श्रद्धा वलकर हिचा आफताब पूनावाला या जिहाद्याने केलेल्या अमानुष हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून सदर विकृत क्रूर व्यक्तीस भर चौकात फाशी द्यावी, देशात संपूर्ण देशात जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत.

या निवेदनावर हिंदू धर्म रक्षक हिंगोली कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related posts

मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य  – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

Santosh Awchar

स्थानिक झेंडूचे दर पडले! बेंगलोर, कोल्हारकडील झेंडू बाजारात दाखल

Gajanan Jogdand

अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण: सेनगाव बंद, तर मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक, काही संघटनांचे पदाधिकारी नजर कैदेत

Gajanan Jogdand

Leave a Comment