Marmik
Hingoli live

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना; बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

हिंगोली : संतोष अवचार  

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 2 जून, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 57.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 49.14 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related posts

दोन वर्षापासून फरार इसमास पोलिसांनी सिताफिने पकडले

Santosh Awchar

विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे ध्वजारोहण

Gajanan Jogdand

डी. एस. चौधरी यांनी स्वीकारला जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार

Santosh Awchar

Leave a Comment