Marmik
Hingoli live

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना; बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

हिंगोली : संतोष अवचार  

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 2 जून, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 57.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 49.14 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related posts

दिलासादायक : शेतकऱ्यांनो! आता एक रुपयात काढा पीक विमा!! लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने घेतला निर्णय

Gajanan Jogdand

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Gajanan Jogdand

प्रजासत्ताक दिन : गोकुळ विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

Gajanan Jogdand

Leave a Comment