Marmik
Hingoli live क्राईम

दोन गुन्हेगार एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सतत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही सुरू केली आहे.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील वगरवाडी गावातील राहणारे सराईत गुन्हेगार नामे सोपान शेषराव कदम (वय 29 वर्ष), ज्ञानेश्वर शेषराव कदम (वय 30 वर्षे) दोन्ही (रा. वगरवाडी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली) यांच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल असून ते सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.

त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले होते.

यावरून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे व पोलीस उपनिरीक्षक एस. एस. तावडे यांनी नमूद आरोपीं विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली विवेकानंद वाखारे यांनी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये दोन्ही आरोपींना आजपासून पुढील एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

मोटारपंप चोरणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुस्क्या

Gajanan Jogdand

मानवत खून प्रकरण; वर्षभरापासून फरार आरोपीस घातक हत्यारासह घेतले ताब्यात

Santosh Awchar

मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि कावड यात्रेमुळे वाहतुकीत बदल

Santosh Awchar

Leave a Comment